बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात रोज काहीना काही घटना घडतच असतात. मीडिया आणि सोशल मीडियावर वर बॉलिवूड हे दिवसरात्र चर्चेचा विषय असते. यातील काही घटना या नकळत घडतात तर काही चर्चेत राहण्यासाठी मुद्दामून घडवून आणल्या असतात. मग त्या वैयक्तिक प्रमोशन साठी असो किंवा एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आजकाल तिच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटामुळे चर्चेत राहिली होती. फॉक्स स्टार स्टुडिओज निर्मित ‘लक्ष्मी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी हॉटस्टार वर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांनी मुख्य भूमिका निभावल्या आहेत. हा चित्रपट तामिळ हॉरर कॉमेडी फिल्म ‘कंचना’ चा रिमेक असून अभिनेता राघव लॉरेन्स यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
तेव्हा कोरोना मूळे हा चित्रपट थिअटर्स मध्ये रिलिज करता आला नसल्यामुळे निर्मात्यांनी हॉटस्टार वर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. परंतु असे असले तरी या चित्रपटाच्या मार्केटिंग साठी सगळेच कलाकार मीडिया हाऊसेसना मुलाखती दिल्या. यातूनच अभिनेत्री कियारा अडवाणी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिने एका प्रश्नाला असे काही भन्नाट उत्तर दिले होते, ज्याच्या आधारे ती चर्चेत आली. एका सत्रात कियाराला काही प्रश्न विचारले गेले.
लक्ष्मी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कियारा अडवाणी अनेक मीडिया हाऊसशी बोललीआणि यादरम्यान तिने असा धक्कादायक खुलासे केले की सर्वांनाच आश्चर्य वाटले. कियाराला विचारण्यात आले होते की अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत तिला से-क्स-पेक्षा प्रिय आहेत? यावर उत्तर देताना कियारा अडवाणी म्हणाली, तिला पिझ्झा, शॉपिंग आणि एक चांगला चित्रपट या तीन गोष्टी से-क्स पेक्षा जास्त आवडतात.
या मुलाखतीत कियारा अडवाणी यांनाही विचारण्यात आले होते की, जर तिला तिच्या पुढच्या आयुष्यात तिला काय व्हायला आवडेल? यावर कियारा अडवाणी म्हणाली की, तिला एक सुरवंट बनवायचे आहे जेणेकरुन नंतर ती फुलपाखरू बनू शकेल.
कियारा अडवाणी यांनी आपल्यासोबत घडलेली एक वाईट दुर्घटना शेअर करताना सांगितले की ती एकदा मरता मरता वाचली आहे. कियारा म्हणाली, ‘मी एका मित्रासमवेत सहलीला गेलो होतो. त्या सहलीला माझ्या खोलीला अचानक आग लागली . ही आग इतकी भयंकर होती की मी माझे प्राणही गमावू शकले असते. ‘
हॉटेल रुम मध्ये आग लागल्याने मी खूप घाबरले होते. घाबरीन मी बेशुद्ध झाले. अश्या वेळी माझ्या मित्राने धाडस दाखवले. त्याने वेळीच हॉटेल स्टाफ ला मदतीला बोलावले तसेच फायर ब्रिगेड ला कॉल केला. त्या दरम्यान त्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली. अशा प्रकारे त्याने माझा जीव वाचवला आहे.
आपल्या पहिल्या रिलेशनशिपबद्दल बोलताना कियारा म्हणाली आहे की, ‘जेव्हा मी पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये आले तेव्हा मी दहावीत होतो. मग आईने मला फोनवर बोलताना पकडले. मग तिने मला समजावले की, तुझ्या बोर्डाच्या परीक्षा येत आहेत, सध्या तुझे सर्व लक्ष अभ्यासावर असायला हवे.
यापुढे कियारा ने असेही नमूद केले की तिचे कुटुंब हाच तिचा सर्वात मोठा पाठिंबा आहे. तिच्या आईने तिला कायमच पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळेच ती आज इथपर्यंत पोहोचू शकली आहे.