स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ही कथा सांगण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता संदिपसिंग ने दिग्दर्शक महेश व्ही मांजरेकर ला साईन केले आहे. त्यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करताना सावरकरांच्या कथेचे हक्क संपादन करणारा संदीप सिंह म्हणाला की, वीर सावरकरांची स्तुतीही केली जाते आणि तितकीच टीकाही केली जाते. त्यांना आज ध्रुवीकरण करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रक्षेपित केले जाते, परंतु मला असे वाटते की लोकांना त्यांच्याबद्दल अजून काही माहिती नाही.
या चित्रपटाची घोषणा करताना संदीप म्हणतो की, “वीर सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या भूमिकेबद्दल पुष्कळ लोक मान देतात, तर काहीजण स्वातंत्र्यलढ्यातल्या त्यांच्या भूमिकेबद्दल आणि नंतर हिंदुत्वाच्या तत्वज्ञानाबद्दल त्यांचावर टीका देखील करतात.” पण विनायक दामोदर सावरकरांची कहाणी लोकांसमोर आणण्याची गरज आहे आणि या भावनेतून प्रेरित होऊन आपण हा चित्रपट तयार करणार आहोत.
याबद्दल स्पष्टीकरण देताना निर्माता अमित बी वाधवानी म्हणतो की, ‘आम्ही एक चित्रपट बनवितो याचा मला आनंद झाला की आम्ही स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानावर प्रकाश टाकणारा चित्रपट बनवत आहेत. वीर सावरकर हे भारतीय इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, जो सांगायलाच हवा. दुर्दैवाने, त्यांच्याविषयीच्या पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीमुळे त्यांना इतिहासात योग्य स्थान मिळालेले नाही.
महेश व्ही मांजरेकर म्हनाला की, ‘वीर सावरकरांचे जीवन आणि त्यांचा काळ मला नेहमीच आकर्षित करतो. मला विश्वास आहे की ती एक अशी व्यक्ती आहे जीला इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही… त्यांच्या आयुष्याने बर्याच लोकांना प्रभावित केले असेल. मला माहित आहे की दिग्दर्शक म्हणून हे माझ्यासाठी एक आव्हान आहे, व मला हे आव्हान स्वीकारायचं आहे. ‘
वीर सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि ते हिंदू महासभेचे सदस्यही होते. त्यांच्या मृत्यूनंतर 55 वर्षानंतरही त्यांनी राजकीय स्पेक्ट्रमच्या दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत राहिले. स्वतंत्रवीर सावरकर चे चित्रीकरण हे लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रात होणार आहे.