जूही चावला ही बॉलिवूडमधील सर्वाधिक पसंतीमधील एक अभिनेत्री आहे. 90 च्या दशकात, प्रत्येक निर्मात्यांना तीच्यासह काम करावा असेेे वाटत होते. तीच्या सौंदर्यामुळे, व उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रत्येकजण तीच्याबद्दल वेडा असायचा. जुहीने 1984 मध्ये मिस इंडियाचा मुकुट जिंकून यापूर्वीच तिच्या सौंदर्याने लोकांना वेड लावले होते.
पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर जूही चावला पाहून प्रत्येकजण तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रभावित झाला होता. यानंतर जुहीला एकामागून एक चित्रपट मिळू लागले. जूही करिअरच्या शिखरावर पोहोचताच तिने पाच वर्षांने मोठा असलेल्या बिजनेसमैन जय मेहताशी लग्न केले. त्यांच्या अचानक झालेल्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.
जूही चावलाच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्य झाले की, कारण तिच्या प्रेमप्रकरणाची कोणालाही कल्पना नव्हती. लग्नानंतर जेव्हा जूही आणि जय मेहता यांचे चित्र पहिल्यांदा समोर आले तेव्हा देशातील लोकांनी तिच्या पतीची खूपच चेष्टा केली. इतकेच नव्हे तर देशातील अनेकांनी जूहीसाठी अश्लील भाष्य करताना तिच्या नवऱ्याला म्हातर्याची उपमा दिली होती.
तसेच लोकांनी हे देखील बोलले होते की तीने पैशासाठी लग्न केले आहे. जूही चावला चा पती जय मेहता बद्दल सांगितले तर तो खूप मोठे उद्योगपती आहे. जय मेहता मेहता समूहाचा मालक आहे. जूही चावला जय मेहता ची दुसरी पत्नी आहे. जय मेहताने सुजाता बिर्लाशी पहिले लग्न केले होते. परंतु 1990 मध्ये बंगळुरूमध्ये विमान अपघातात सुजाता बिर्ला चे निधन झाले.
त्यानंतर जूही चावला आणि जय मेहता यांनी 1995 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनीही अतिशय गुप्त पद्धतीने लग्नही केले. या लग्नाच्या काही काळानंतरच जूहीची बहीण सोनिया चे कर्करोगाने निधन झाले. तसेच तिचा भाऊ बॉबीचेही दीर्घ आजाराने निधन झाले. बातमीनुसार, जूहीचा भाऊ बॉबी किंग खान हा शाहरुख खानच्या चिली प्रॉडक्शन हाऊसचा सीईओ होता.
बॉलिवूड अभिनेत्री जूही आणि जय मेहताच्या आयुष्यात तेव्हा आनंद आला होता, जेव्हा जुही पहिल्यांदा आई बनणार होती. 2001 मध्ये, जूहीने मोठी मुलगी जाह्ववीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन वर्षांनंतर तिने एका मुलाला जन्म दिला. आज जूही चावला बॉलिवूडपासून खूप दूर आहे. ती आपल्या मुलांची आणि कुटुंबाची काळजी घेते.