जेव्हा सुंदर महिलासोबत सोबत एका हॉटेल रूम मध्ये रंगेहाथ सापडला होता हा दिग्गज अभिनेता..

बॉलिवूडचा सुपरस्टार, संजु बाबा नावाने ओळखला जाणारा दिग्गज अभिनेता सुनील दत्त यांचा सुपुत्र, संजय दत्त याचे बॉलिवूड मध्ये लाखो चाहते आहेत. नुकतंच 2 वर्षांपूर्वी संजय दत्तवर एक बायोपिक तयार केला गेला होता. हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता व सुपरहिट ठरला. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर बक्कळ कमाई केली.

संजय दत्तच्या आयुष्यावर जेव्हा हा चित्रपट बनवला होता, तेव्हा संजय दत्तच्या आयुष्याशी निगडित अनेक न पाहिलेले आणि न ऐकलेले किस्से या चित्रपटाद्वारे लोकांच्यासमोर आले. आज आम्ही तुम्हाला संजय दत्तच्या जीवनाशी निगडित असंच एक रहस्य सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

महत्त्वाचे म्हणजे संजय दत्तच्या आयुष्यात बर्‍याच अभिनेत्र्या आल्या आणि त्यातील तिघांशी तर चक्क त्याने लग्न केले. संजयचे पहिले लग्न रिचा शर्मासोबत झाले होते. पण रिचाच्या निधनानंतर संजय दत्तच्या आयुष्यात मॉडेल रिया पिल्लई आली. विशेष म्हणजे जेव्हा संजय दत्त मुंबई बॉ-म्ब-स्फोटाच्या खटल्याला सामोरे जात होता तेव्हा रिया त्याच्यासोबत होती.

त्यावेळी परिस्थिती इतकी बिकट होती की संजय दत्तला तुरुंगात जावे लागले आणि तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याने रिया सोबत लग्न केले. अशा परिस्थितीत असे वाटले होते की लग्नानंतर संजय सुधारेल परंतु असे झाले नाही. संजय दत्तने लग्नानंतर पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली आणि या दरम्यान त्यांने विश्वसुंदरी सुष्मिता सेन समवेत एक चित्रपट साईन केला.

वास्तविक, सुष्मिता सेन आणि संजय दत्त एका स्टेज शो मध्ये भेटले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दोन-दोन भेटीनंतर लगेचच संजय दत्त आणि सुष्मिता सेन एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. दोघे देशाबाहेर कुठे भेटले तर एकाच हॉटेलमध्ये राहत असत. याशिवाय संजय दत्तने सुष्मिता सेनला चित्रपटांमध्ये घेण्याची शिफारस अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमोर केली.

या सगळ्या भानगडीत संजयची पत्नी रियाला मात्र या सर्व गोष्टींची अजिबात माहिती नव्हती. वास्तविक संजय दत्तवर तिचा पूर्ण विश्वास होता. पण त्यानंतर संजय दत्तने पुन्हा अशी एक मोठी चूक केली की या एका चुकीमुळे दोघांचेही जीवन पालटले. संजयच्या जीवनात असे काही घडले की त्याचा पुन्हा एकदा घटस्फोट झाला आणि रिया त्याला सोडून गेली.

संजय आणि सुष्मिता जेव्हा एकत्र परदेशात होते तेव्हा एका रिपोर्टरला नुकतीच मिस युनिव्हर्स झालेल्या सुश्मिताची मुलाखत घ्यायची होती आणि या संदर्भात तो पत्रकार बराच काळ हॉटेलच्या लॉबीमध्ये तिची वाट पाहत होता. यावेळी त्याने पाहिले की संजय आणि सुष्मिता दोघेही एकत्र येत आहेत. त्यानंतर रिपोर्टरला दोघांची मुलाखत घ्यायची होती.

पण जेव्हा त्या पत्रकाराने संजय दत्तला त्या दोघांकडे छायाचित्राची मागणी केली तेव्हा संजय दत्त खूप चिडला. कदाचित संजय दत्तला आपलं गुपित उघडण्याची भीती वाटत होती. अशा परिस्थितीत संजय दत्तने त्या रिपोर्टरला हॉटेलमधून बाहेर जाण्यास सांगितले, पण तो रिपोर्टर पुन्हा पुन्हा विनवणी करत राहिला.

यावेळी रिपोर्टरने संजय आणि सुष्मिताची एकमेकांसोबत अनेक छायाचित्रेही घेतली. त्यानंतर संजयचा पारा वाढला आणि त्याने रिपोर्टरला मारहाण करण्यास सुरवात केली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की संजय दत्तने त्याचा कॅमेरादेखील तोडला. यानंतर संजय आणि सुष्मिता दोघेही त्यांच्या रूममध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांचे छायाचित्र वर्तमान पत्रात पाहून आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे या घटनेनंतर संजय आणि सुष्मिता यांच्यातील संबंध उघडकीस आले.

ही बातमी पाहून संजयची पत्नी रियासुद्धा खूप चिडली होती. अशा परिस्थितीत ती संजयकडे बातमीचे पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी गेली. रिया लंडनला येत आहे हे जेव्हा सुष्मिताला समजले तेव्हा तिने आपली बॅग पॅक केली आणि ती तेथून पळ काढला आणि त्यानंतर संजय दत्तनेही सुष्मितासोबतच्या त्याच्या प्रेमसंबंधाची कबुली दिली आणि रियाकडून माफी मागितली.

रियाने जरी संजय दत्तला माफ केले होते, परंतु त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. विशेष म्हणजे सुष्मिता गेल्यानंतर संजय दत्तने एका स्ट्रग्लिंग अभिनेत्रीबरोबर फ्लर्ट करणे सुरू केले. अशा परिस्थितीत रियाने तिचे संजयबरोबरचे दहा वर्षांचे नातेही मोडले. त्यानंतर संजय दत्तने मान्यतासोबत लग्न केले आणि आता तो मान्यता आणि दोन मुलांसमवेत खूप आनंदी जीवन व्यतीत करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.